...म्हणून भारतातील जोडप्यांना नकोय मुलं, जगभरात वाढतोय ट्रेंड

लग्नानंतर मुल नकोच, असं जोडप्यांना वाटू लागलंय, पण कारणं काय आहेत?

जगभरात अनेक देशांत जन्मदर कमी होतो आहे. पालक मुलांना जन्म देण्यास अनुच्छुक आहेत.

प्रत्येक देशागणिक त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण त्यातही प्रमुख कारण आहे ते म्हणजे मुलांना वाढवणं परवडत नाही म्हणून!

गेल्यावर्षी म्हणजे २०२४मध्ये यासंदर्भात १४ देशांची पाहणी करण्यात आली. त्यात हा निष्कर्ष निघाला.

परवडत नाही म्हणून मुलं नकोत असं दक्षिण कोरियाच्या सर्वाधिक म्हणजे ५८ टक्के लोकांना वाटतं, तर दक्षिण आफ्रिकेच्याही ५३ टक्के लोकांनाही याच कारणानं मुलं नको आहेत.

भारतातील जोडप्यांना मुलं का नकोय, तर आर्थिक चणचण, राहायला घर नाही आणि तिसरं कारण म्हणजे नोकरीची शाश्वती नाही.

अशीच काही परिस्थिती जगभरातील देशांमध्ये आहे. तिथल्या जोडप्यांनाही कोणत्या कारणामुळे मुलं नकोय, पहा. 

Click Here