जीवन विमा पॉलिसी खरेदी करताना नॉमिनीचे नाव देणे आवश्यक असते.
जीवन विमा पॉलिसी खरेदी करताना नॉमिनीचे नाव देणे आवश्यक असते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, विमा कंपनी नॉमिनीला पैसे देते.
जेव्हा पॉलिसीधारक व नॉमिनी या दोघांचाही मृत्यू होतो तेव्हा मात्र समस्या निर्माण होते. अशावेळी विम्याचे पैसे नेमके कोणाला मिळतात हे जाणून घेऊ....
पॉलिसीधारक व नॉमिनीचाही मृत्यू झाला, तर नॉमिनीचा कायदेशीर वारस दाव्यासाठी पात्र मानला जातो.
मात्र, विमा कंपनी पॉलिसीच्या अटी आणि शर्तीवर आधारित अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेते. कायदेशीर वारस कंपनीकडे विम्याच्या पैशासाठी दावा करू शकतो. कागदपत्रे तपासून कंपनी पैसे देते.
हिंदू वारसा कायद्यात, कायदेशीर वारसांना दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. पहिल्या श्रेणीमध्ये वर्ग एक असतो. यात कायदेशीर वारसांचा समावेश असतो.
यामध्ये पत्नी, मुलगा किंवा मुलगी आणि आई यांचा समावेश आहे. जर पॉलिसीधारकाचा मुलगा किंवा मुलगी देखील मरण पावली तर नातू आणि नात विम्याच्या पैशाचा दावा करू शकतात.
जर वर्ग एक कायदेशीर वारसात कोणीही नसेल तर वर्ग २ कायदेशीर वारसांचा विचार केला जातो. यामध्ये वडील, भाऊ, बहीण, पुतणे, भाची यांचा समावेश आहे.