सध्या जगात ११ देशांकडे अण्वस्त्रे आहेत, यापैकीच एक पाकिस्तान आहे ज्याची अण्वस्त्रे सर्वात असुरक्षित आहेत.
जगात सध्या युद्धाची परिस्थिती आहे. भारत-पाकिस्तान युद्ध थांबत नाही तोवर इस्रायलने इराणवर हल्ले चढविले आहेत.
पाकिस्ताने सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे तर अमेरिकेची लढाऊ विमाने, युद्धनौका आखाताकडे येऊ लागली आहेत.
अण्वस्त्र निर्मितीवरूनच इस्रायलने इराणवर हल्ले चढविले आहेत. यात इराणची मोठी हानी झाली आहे.
तिकडे रशियादेखील युक्रेनवर अण्वस्त्रे टाकण्याची धमकी अनेकदा देऊन बसला आहे.
अशातच जर दोन अण्वस्त्रे हवेतच एकमेकांवर आदळली तर काय होईल, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
असे यापूर्वी कधीच झालेले नाहीय, यामुळे कोणाकडे याचे अचूक उत्तर नसेल.
परंतू जे होईल ते अत्यंत विनाशकारी असेल. कारण हवेत अणू किरणांचे उत्सर्जन होणार आहे आणि ते हवेच्या रोखाबरोबर सगळीकडे पसरणार आहे.
दोन अणुबॉम्ब एकमेकांवर आदळले तर त्यापासून शक्तीशाली ताकद निर्माण होईल आणि ती बराचसा भूभागही उध्वस्त करून जाणार आहे.
जशी सौरवादळे सूर्यावर उधळतात तसेच वादळ पृथ्वीवर येईल, एवढा मोठा आवाज असेल की त्याने देखील पृथ्वीवरील प्राणीमात्रांना धोका निर्माण होऊ शकतो.
परंतू, हे सर्व दोन्ही अणुबॉम्ब किती क्षमतेचे आहेत, किती वेगाने ते आदळणार आहेत व किती उंचीवर आदळणार यावर ते सर्व अवलंबून असणार आहे.
तसेच अॅक्टीव्ह नसलेले अणुबॉम्ब एकमेकांवर आदळले तर ते नष्ट होतील आणि रेडिएशन लीक होईल. विध्वंस होण्याची शक्यता कमी आहे.