भारताची 'ही' शहरे आहेत स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध!

भारताच्या वेगवेगळ्या शहरातील स्ट्रीट फूड जगभरात खूप लोकप्रिय आहे.

भारतीय स्ट्रीट फूडची चव अनोखी आहे. देशातील प्रत्येक शहराच्या रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चव चाखायला मिळते.

दिल्लीच्या छोले-भटुरे आणि कबाबची चव सर्वांचे मन जिंकते.

मुंबईतील वडा पाव, पाणीपुरी आणि बॉम्बे सँडविच पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी येईल.

जर तुम्ही कोलकात्याला भेट देणार असाल तर पुचका, काठी रोल आणि मिस्टी डोई चाखायला चुकू नका.

पंजाबमधील अमृतसरी छोले-कुलचे, जिलेबी आणि लस्सी एकदा खाल, तर आयुष्यभर लक्षात राहील.

जर तुम्ही बनारसला जात असाल तर येथील चाट, कचोरी आणि जिलेबी चाखायला विसरु नका.

जयपूरची कांदा कचोरी, घेवर आणि दाल-बाटी चुरमा यांची चवही अप्रतिम आहे.

हैदराबादी बिर्याणी, हलीम आणि इराणी चहा ही येथील शाही चव आहे.

Click Here