औदुंबराला पाणी घाला, दत्तकृपा मिळवा!

उंबराच्या झाडाला आपण औदुंबर असेही म्हणतो. हे झाड म्हणजे दत्त गुरूंचे निवास स्थान. औदुंबराला रोज पाणी घालण्याचे फायदे जाणून घेऊया. 

सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. पिंपळ, तुळशी, वड, शमी याबरोबरच वैज्ञानिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे उंबराचे झाड!

विष्णूंनी नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला. त्यांच्या नखाला लागलेले विष काढण्यासाठी लक्ष्मीने उंबराचा रस लावला. 

या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 

असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास  किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो.

उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. त्यामुळे दारिद्रय, आर्थिक समस्या आणि तंगी दूर होते. 

दर गुरुवारी उंबराला ११ प्रदक्षिणा घालाव्यात. या झाडाखाली बसून 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' या मंत्राचा जप करावा. घरात सुख शांती राहते. 

प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन-संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर रोज उंबराला पाणी घाला. 

रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन-नामःस्मरण करा. मन:स्वास्थ्य सुधारेल. 

आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सान्निध्य सर्वार्थाने चांगले आहे. 

Click Here