केसगळती रोखण्यासाठी कडुलिंब अत्यंत गुणकारी आहे.
सध्याच्या काळात अनेक जण केसगळती आणि टक्कल पडण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.
केसगळती रोखण्यासाठी आणि नवीन केसांची वाढ होण्यासाठी कडुलिंब अत्यंत गुणकारी आहे.
कडुलिंबाच्या तेलाने टक्कल पडलेल्या ठिकाणी मालिश केल्यास त्या जागी नवे केस उगवू शकतात.
कडुलिंबामुळे हेअरफॉल, कोंडा, डोक्यात सतत खाज येणे यांसारख्या समस्याही दूर होतात.
केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवा.
अकाली केस पांढरे होत असतील तर कडुलिंब आणि बोराची पानं पाण्यात उकळून या पाण्याने केस धुवा महिन्याभरात फरक दिसून येईल.