या राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका..! 

आज सकाळी दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले.

Delhi NCR Earthquake: आज (गुरुवार) सकाळी दिल्ली-NCR मध्ये सुमारे १० सेकंदांपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

दिल्ली आणि लगतच्या नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम, हिसार, रोहतक आणि सोनीपत येथेही सकाळी ९.०४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. 

भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर परिसर असल्याचे सांगितले जात आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.४ होती. यामुळे लोक खूप घाबरले होते. 

भारतातील ज्या भागात सर्वाधिक भूकंप होतात ते हिमालय आणि त्याच्या आसपासचे क्षेत्र आहेत. 

सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड येथे युरेशियन प्लेटशी आदळला होता, त्यानंतर हिमालयाची निर्मिती झाली. म्हणूनच दरवर्षी हिमालय देखील एक सेंटीमीटर वर वाढत आहे. 

याच हालचालीमुळे भूकंप होतात. हिमालयाच्या आसपासचे क्षेत्र जसे की हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम, उत्तराखंड आणि वायव्य राज्यात भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे.

याशिवाय, गुजरात आणि आसाम देखील भूकंपांना सर्वाधिक धोका असतो. दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या डोंगराळ भागातही भूकंपाचे धक्के जाणवतात. 

दिल्ली-एससीआरमध्ये अनेक भूकंप होतात. हा भाग भूकंपीय क्षेत्रात येतो. ईशान्य भारतातील सर्व राज्यांनाही भूकंपांचा सर्वाधिक धोका आहे.

Click Here