चहाचे पिण्याचे दुष्परिणाम
आपल्याकडे चहाप्रेमींची काही कमी नाही. काही जण दिवसातून ३ ते ४ वेळा सहज चहा पितात. परंतु, चहा शरीरासाठी चांगला नाही.
चहाचं अतिसेवन केल्यामुळे त्याचा परिणाम पचनशक्तीवर होतो. ज्यामुळे आम्लपित्त, अंगदुखी, सांधेदुखीच्या समस्या निर्माण होतात.
चहामध्ये साखर घातल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, स्थूलता यांसारख्या समस्या जाणवतात.
अनेक जण काळा चहा पितात. परंतु, काळा चहा चवीला तुरट असतो ज्यामुळे रक्तदाब वाढणे, पक्षाघात, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.
नियमित चहा प्यायल्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.