शंकर महाराजांची कालातीत ९ वचने, बोध काय?

शंकर महाराजांची शिकवण आजही तितकीच लागू पडत असल्याचे दिसते.

श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. शंकर महाराजांची समाधी धनकवडी भागात आहे.

शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांना ते आपले गुरू मानत. मालक असे त्यांना संबोधत असत.

शंकर महाराज यांची शिकवण, बोध, वचने कालतीत असून, आजही लागू पडतात, असे म्हटले जाते.

गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी.

जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात. त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो.

प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल.

साधनमार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते. पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी.

आशा, इच्छा, हव्यास, वित्त यांची हाव कधीच संपत नाही. मग त्यापोटी दु:ख-वेदना होणारच.

जे आत्मदर्शन प्राप्ती करुन घेतात त्यांना जन्म-मृत्यू नसतो. ते जगद्उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात.

सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ, सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते.

मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर। लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे  आलो.

आत्मकल्याण करुन घ्या. जीवनाचे सार्थक करा. जय शंकर...

Click Here