पायात काळा धागा, राहु-केतु दोष दूर होतो?

कुंडलीतील राहु-केतु दोषावर उपाय म्हणून पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.

बाळाला दृष्ट लागू नये म्हणून हातापायांना काळा दोरा, कमरेला करगोटा बांधतात. मात्र मोठ्या माणसांच्या पायातही काळा धागा बांधलेला दिसतो.

काही मुली तर फॅशन म्हणूनही तो धागा बांधतात, तर काही जण दृष्ट लागू नये म्हणून! मात्र याला शास्त्राधार आहे का?

कुंडली दोषावर उपाय म्हणून ज्योतिषशास्त्रात अनेक तोडगे सांगितले जातात. पायात काळा धागा बांधणे हाही ज्योतिषशास्त्राचा एक तोडगा आहे.

कुंडलीतील राहु-केतुचे प्राबल्य कमी होऊन जीवनातील अडचणींचे निराकरण होण्यास मदत होते, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

मात्र तो फॅशन म्हणून बांधणे योग्य नाही. तो संरक्षण हेतू काम करणार नाही. कारण पत्रिकेत हा दोष आहे, त्यांनाच तो उपाय सांगितला जातो. 

ज्यांच्या कुंडलीत राहु-केतु दोष आहे, त्यांना ज्योतिषी एका पायात काळा धागा बांधा असा सल्ला देतात. 

हा धागा स्तोत्रमंत्रांचे उच्चारण करून प्रभावित केला जातो. मगच तो वापरण्याचा सल्ला दिला जातो.

ज्यांच्या आयुष्यात शनीची ढिय्या आणि साडेसती सुरू असते त्यांनाही काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.

कारण शनी देवाला आपण काळ्या गोष्टी अर्पण करतो. काळा धागा देखील शनी देवाच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी बांधण्याचा सल्ला दिला जातो. 

पुरुषांना काळा धागा बांधायचा असेल तर मंगळवारी उजव्या पायाला बांधावा. कुंडलीत शनि बलवान होतो. राहु-केतुही त्रास देत नाहीत. 

महिलांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर डाव्या पायात घालणे योग्य ठरते. शनिवारी हा धागा पायास बांधावा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

Click Here