मे-जूनमध्ये एकापेक्षा एक मन सुन्न घडणाऱ्या घटना घडल्या, तरी जुलैमध्ये भीतीचे सावट दूर झाले नाही असे भाकीत आहे; म्हणून...
२०२५ सुरु झाल्यापासून एकापाठोपाठ एक दुर्घटना घडत आहेत. मे-जून मध्ये तर कहरच झाला.
पेहलगाम अटॅक असो, अहमदाबाद विमान दुर्घटना असो नाहीतर केदारनाथ येथे हेलिकॉप्टरचे पडणे असो, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
ज्योतिषी सांगतात संकट अजून टळलेले नाही. येत्या काळात तर ग्रहदशा आणखी प्रतिकूल स्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे.
बुध आणि केतुचे राशीपरिवर्तन आणि राहू कुंभ राशीत परिवर्तन करणार आहे. हे स्थित्यंतर १८ वर्षांनी होत असल्याने दीर्घ काळ प्रतिकूलता राहते.
गुरु अस्त होऊन तोही राशीबदल करणार असल्याने या काळात नातेसंबंध तसेच अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते.
राहू केतूच्या स्थित्यंतराचा परिणाम विश्वभर दिसून येईल. भांडण, तंटा, घात, पात, कलह यामुळे युद्धजन्य स्थिती, आतंकवादाची भीती निर्माण होईल.
महागाईचे चटके, सोने-चांदी भाववाढ, पाण्याचे प्रश्न यामुळे दैनंदिन गरजांशी संबंधित प्रश्न भेडसावतील.
दुर्दैवाने २०२५ ते २०३० ही युद्धजन्य परिस्थिती टिकून राहील. त्याचे नाहक चटके लोकांना सहन करावे लागतील.
हे कमी म्हणून की काय नैसर्गिक आपत्ती, जसे की भूस्खलन, पूर, दुष्काळ, ज्वालामुखी, भूकंप याही घटना कमी अधिक प्रमाणात घडतील.
या काळात जनता न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात नाही तर रस्त्यावर उतरून मोर्चे काढून न्याय मागताना दिसेल.
हे सगळं टाळता येणे शक्य नाही का? नक्कीच आहे, त्यासाठी प्रत्येकाने देवाकडे स्वतःपुरते न मागता विश्वकल्याणासाठी प्रार्थना करायची आहे.
एकीचे बळ, ही गोष्ट माहीत आहेच... त्याप्रमाणे अध्यात्माची ताकद वाढली, प्रत्येकाने समजूतदारपणा दाखवला, वैयक्तीक ग्रह बदलले तर बदल घडेल.