वयाची शंभरी गाठायची असेल तर... 

दीर्घायुषी व्हावे असे प्रत्येकाला वाटते, मात्र छोटे मोठे आजार आले तरी आपली तंतरते; जर दीर्घायुष्य हवे असेल तर पुढील नियम पाळा. 

रोज सकाळी झोपून उठल्यावर चूळ न भरता पेलाभर पाणी प्या. रात्रभर जिभेवर असलेली लाळ पोटात जाणे औषधी ठरते. 

दात घासल्यानंतर कोमट पाणी प्या आणि नंतरच चहा प्या. नाश्ता केल्यावर लगेच आंघोळीला जाऊ नका, जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो. 

एकाच वेळी भरपूर पाणी न पिता दिवसभरात दर तासाला एक तांब्या पाणी प्या, अशाने सायंकाळपर्यंत अडीच तीन लिटर पाणी प्यायले जाईल. 

जेवताना पाणी पिऊ नका, पोटफुगी होईल. जेवणाआधी एक तास आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्या. पचन चांगले होईल. 

 रोज अर्धा तास चालण्याचा आणि अर्धा तास व्यायामाचा सराव ठेवा. शरीर हलते-फिरते राहील, निरोगी आणि लवचिक राहील. 

सकाळची न्याहारी ८ वाजता, दुपारचे जेवण १२ वाजता आणि सायंकाळचे जेवण ७ च्या आधी घ्या. नाश्ता पोटभर, जेवण बेताने आणि रात्री हलका आहार घ्या. 

आहारात सॅलड, कोशिंबीरी, फळं, मोड आलेली कडधान्य यांचा जास्त समावेश करा. तेलकट आणि गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. 

औषधांची गरज वाटलीच तर आयुर्वेदाची मदत घ्या, ज्यामुळे रोग समूळ नष्ट होतो आणि दीर्घकाळ परिणाम मिळतो. 

रोज १० मिनिटं ध्यानधारणा करा, श्लोक, वाचन, चिंतन, मनन, श्रवण यामध्ये मन रमवा. मन शांत असेल तर शरीर सुरळीतपणे काम करेल. 

सूर्योदयापूर्वी उठा, रात्री १०.३० वाजता झोपा, तणावमुक्त जीवन जगा, हसा, बोला, लोकांमध्ये मिळून मिसळून राहा, रील नाही तर रियल लाईफ जगा, आरामात शंभरी गाठाल!

Click Here