गौतम अदानी हे भारतातील एक नावाजलेले उद्योगपती आहेत. देशातील Top 5 श्रीमंतांमध्ये त्यांची गणना होते.
गौतम अदानी यांचे एकदा अपहरण झाले होते हे फार कमी लोकांना माहिती असेल. जाणून घेऊया त्याबद्दल...
गौतम अदानी आणि शांतीलाल पटेल यांचे १ जानेवारी १९९८ ला मोहम्मदपुरा येथून अपहरण करण्यात आले होते.
कारच्या समोर अचानक एक दुचाकी आली आणि काही लोकांनी त्यांना कारमधून बाहेर काढून सोबत नेले.
अपहरण झाल्याच्या प्रकारानंतर तब्बल ९ जणांविरोधात सरखेज पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली.
अपहरणकर्त्यांनी अदानी आणि पटेल यांना एका अज्ञात ठिकाणी नेले होते. त्यांचा शोध घेतला तरीही ते सापडत नव्हते.
फजलू रहमान याने अपहरण केल्याचे तपासात समोर आले. गँगस्टर फजल उर रहमान उर्फ फजलू हा मुख्य आरोपी होता.
फजलू हा मूळ बिहारचा होता. तो गँगस्टर होता आणि एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा कट्टर शत्रू मानला जात होता.
अदानी आणि पटेल दोघांना सोडण्यासाठी अपहरणकर्त्यांनी खंडणी म्हणून तब्बल १५ कोटींची मागणी केल्याची चर्चा आहे.
लंडनच्या फायनान्शियल टाइम्सच्या मुलाखतीत याबद्दल बोलताना ते म्हणाले की- ही आयुष्यातील वाईट घटना होती.