पार्टी, गेट टू गेदर यांसारख्या कार्यक्रमात सर्रास दारू प्यायली जाते.
सध्याच्या काळात दारु पिणं ही फॅशन झाली आहे.
काही जणांना दारु खूप पटकन चढते. परंतु, असं का होतं यामागे काही कारणं आहेत.
रिकाम्यापोटी दारु प्यायल्यामुळे दारू थेट पोटात जाते. ज्यामुळे अल्कोहोल पहिले छोट्या आतड्यात जातं. त्यानंतर ते रक्तात वेगाने पसरतं.
ज्या वेगाने रक्कात अल्कोहोल पसरतं त्याच वेगाने नशा चढत जाते. ही नशा ६ ते १२ तास राहते.