अनेकांना जेवण झालं किंवा चहा घेतला की लगेचच वॉशरुमला जायची सवय असते. परंतु,ही सवय चांगली नाही. या सवयीचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन महागात पडू शकते. जेवल्यानंतर लगेच वॉशरुमला गेल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात ते पाहुयात.
टॉयलेटला जाण्याची सवय ही तुमच्या आहारावर अवलंबून असते. सतत मसालेदार खाणं आणि कच्च सलाड खाल्ल्यामुळे तुम्हाला वॉशरुमला जायची इच्छा निर्माण होते.
काही लोकांना ठराविक पदार्थांची एलर्जी असते. परंतु, या पदार्थामुळे आपल्याला त्रास होतोय हे काहींना समजत नाही. ज्यामुळे त्यांना सतत वॉशरुमला जायची इच्छा होते.
जेवल्यानंतर लगेच वॉशरुमला गेल्यामुळे अन्नपचन नीट होत नाही.
अनेकांना जेवण झाल्यावर वॉशरुमला गेल्यास चक्कर येते.किंवा, डोकेदुखीची समस्याही जाणवते.