निर्जला एकादशीला खाणे तर दूरच पण पाणी पिणेही निषिद्ध मानले जाते, अशातच हे व्रत करताना तुळशीलाही त्या दिवशी पाणी घालू नका.
ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असतेच.
तुळशी पूजेच्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद तुम्हाला कायम लाभतो.
तुळशीला हरिप्रिया म्हटले जाते, एकादशी हे विष्णूंचे व्रत आणि तुळस ही त्यांना प्रिय असल्याने निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका.
या दिवशी पाणी न घालण्याचे कारण तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपास करते अशी श्रद्धा आहे. पाणी घातल्याने तिचा व्रतभंग होतो.
हे व्रत पावसाळ्यात येत असल्याने या दिवसात तुळशीला कमी पाणी लागते. जास्त पाणी घातले तर रोप मरते.
तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. तुळशीचे रोप सूर्य प्रकाश मिळेल अशा जागी लावावे.
तुळशीला कीड पटकन लागते. यासाठी दर वीस-बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा.
गोवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक दिवसभर भिजवून ते पाणी महिन्यातून एक दोनदा तुळशीला घालावे. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात.
तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा.
तुळशी हे केवळ रोप म्हणून न पाहता ती विष्णू उपासनेचे माध्यम म्हणून पाहावे आणि तिचे पावित्र्य जपावे आणि आठवणीने एकादशीला पाणी घालणे टाळावे!