सांगलीतील'चोर गणपती; पावणे दोनशे वर्षांची परंपरा

या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटले जाते.

चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. 

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या पर्यावरणपूरक ‘चोर गणपती’चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते.

मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात ‘चोर गणपती’च्या आगमनाने होते. 

मंदिरातील गाभाऱ्यात ही गणपतीची मूर्ती विधिपूर्वक बसविली जाते.

या गणपतीची आख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ आहे.

या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरुवातीपासून म्हणजे सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून त्यांचे जतन करण्यात आले आहे.

पण, मूर्ती पाहिल्यास कागदी लगद्याची आहे, असे जाणवणारही नाही. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने ही मूर्ती अधिक आकर्षक दिसते.

चोर गणपती बसताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले. चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते.

Click Here