अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष केलं की अशा समस्या निर्माण होतात.
डोळ्यासमोर अंधार आला आणि गरगरल्यासारखं झालं तर घाबरुन जाऊ नका.
सगळ्यात प्रथम जिथे जागा मिळेल तिथे लगेच बसून घ्या. किंवा, झोपा.
काही केल्या चक्कर थांबत नसेल तर लिंबूपाणी, गूळपाणी प्या. किंवा साखर पटकन खा.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावरही चक्कर येते. त्यामुळे दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी नक्की प्या.
लिंबू,मध आणि मीठ हे तीनही पदार्थ पाण्यात मिक्स करा आणि प्या. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
चक्कर आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही झोपता त्यावेळी गुलाबपाण्याच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवा. तसंच डोक्यावर आणि डोळ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करा.