आठवड्यातून एकदा कारल्याचा रस घ्याच!

बहुतेकांना नावडणारं कारलं, चवीला कडू जरी असलं, तरी ही त्यापासून मिळणारे फायदे आरोग्यदायी आहेत.

कारल्यामध्ये फॉस्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. 

दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. मसाले न घालता केलेली कारल्याची भाजी गुणकारी ठरते. 

कारल्याचा रस प्यायल्याने यकृत बळकट होते, विकार दूर होतात. कावीळ झाल्यास कारल्याचा रस आवर्जून घ्यावा. 

कारल्याची पानं किंवा कारलं पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग बरे होतात.

उलट्या, जुलाब, जलोदर किंवा कॉलरा झाल्यास कारल्याच्या रसात काळं मीठ टाकून प्यायल्यास लगेच आराम मिळतो. 

रक्त शुद्धीसाठी देखील कारलं अमृतासारखे आहेत. मधुमेहींसाठी तर हे वरदान आहे. 

मूळव्याध झाल्यास एक चमचा कारल्याच्या रस अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासात आराम मिळतो.

संधिवात किंवा हातपायाची जळजळ होत असल्यास कारल्याच्या रस चोळणे फायदेशीर ठरतं.

मूत्रपिंडाच्या विकारावर कारल्याचा रस उपयुक्त ठरतो, अनावश्यक घटक शरीराबाहेर फेकले जातात. 

हृदयविकाराच्या रुग्णांनी तसेच हृदयविकार होऊ नये यासाठी सुदृढ व्यक्तींनी आठवड्यातून एकदा कारल्याचा रस प्यावा. कोलेस्ट्रॉल वाढत नाही. 

कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

Click Here