ऑफिसमध्ये या चार लोकांपासून दूरच राहा; होईल नुकसान
ऑफिसमध्ये काम करत असताना खूप काळजी घ्यावी लागते.नाही तर नुकसान होऊ शकते.
परोक्षे कार्यहंतरम् प्रत्यक्षे प्रियवादिनम्. चाणक्यनीतीतील हा श्लोक. हा श्लोक तुम्हाला ऑफिसमध्ये कोणत्या 4 प्रकारच्या लोकांपासून दूर राहावं हे सांगतो.
चाणक्य म्हणतात की जे लोक सतत तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात, तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात अशांना दूर राहावं. लोक गोड बोलणारे असतात पण तुमचं नुकसान करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
ऑफिसमध्ये असे काही लोक असतात जे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर टिप्पण्या किंवा विनोद करतात, ज्यामुळे इतरांना त्रास होतो. असे लोक इतरांची खिल्ली उडवून त्यांची प्रतिमा खराब करतात.
ऑफिसमध्ये असे बरेच लोक असतात जे इतर सर्वांना स्वतःपेक्षा कमी दर्जाचे मानतात. अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवणं फायदेशीर आहे.
हे लोक कोणालाही प्रगती करताना पाहणं सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे कामात अडथळे निर्माण करू शकतात.
कामाच्या ठिकाणी जेव्हा तुमचा बॉस किंवा सहकारी तुमची प्रशंसा करतो आणि कोणीतरी तुमच्या कामगिरीला कमी लेखण्यासाठी व्यत्यय आणतो, तेव्हा ते तुमचा हेवा करत असल्याचं लक्षण आहे.
तुम्ही अशा लोकांपासून दूर राहावं, कारण ते कधीही इतरांच्या प्रगतीवर आनंद घेत नाहीत.