प्रेमानंद महाराजांचा सल्ला...!
प्रेमानंद महाराज सांगतात, मंदिर हे भगवंताचे घर आहे, याचे भान राखायला हवे.
मंदिराच्या प्रांगणात राजकारण आणि वादविवादाच्या गोष्टी करू नयेत.
मंदिर परिसरात व्यापार किंवा घर अथवा कुटुंबातील लोकांची निंदा-नालस्ती करू नये.
मंदिरात गेल्यानंतर केवळ मौन पाळावे अथवा नामस्मरण करावे.
मंदिरात कधीही भगवंताच्या मूर्तीकडे पाठ करून उभे राहू नये.
मंदिराच्या गर्भगृहाच्या अगदी समोर उभे राहून दर्शन घेऊ नये.
मंदिरात बसून कोणाचीही निंदा करणे हे मनुष्याला पापाचा धनी बनवते.