बाजार घसरला की गुंतवणुकीसाठी संधी असते असं तुम्हीही वाचलं असेल.
पण, बाजारातील प्रत्येक घसरण ही गुंतवणुकीची संधी असते का? हा खरा प्रश्न आहे.
अनेकदा बाजार मोठ्या आर्थिक मंदीमुळे, जागतिक तणावामुळे किंवा इतर नकारात्मक घटनांमुळे कोसळतो.
अशा वेळी कंपन्यांच्या नफ्यावर थेट परिणाम होतो, ज्यामुळे त्यांचे शेअर्स खाली येतात.
अशा परिस्थितीत झालेली घसरल ही दीर्घकालीन असू शकते. ही संधी मानता येणार नाही.
पण, काहीवेळा बाजारातील घसरण ही केवळ तात्पुरती असते. अशावेळी हीच खरी संधी असते.
कारण भविष्यात बाजार स्थिर झाल्यावर किंवा सुधारल्यावर या शेअर्सची किंमत पुन्हा वाढू शकते.
यामुळे, प्रत्येक घसरणीत लगेच गुंतवणूक करण्याऐवजी, बाजाराचे आणि कंपन्यांचे सखोल विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.