कोल्हापुरातील 'या' धबधब्यावर जाताना सोबत तंबाखू नेणे MUST; कारण काय?

पावसाळा सुरू झाल्यापासून अनेकांना धबधब्यावर फिरायला जाण्याचे वेध लागले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. निसर्गप्रेमी कोल्हापुरातील धबधबे पाहण्यासाठी येत असतात. 

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की हा धबधबा प्रसिद्ध आहे. 

बर्की हा धबधबा कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. बर्की धबधब्यासाठी जंगलातून काही अंतर चालत जावे लागते. 

बर्की धबधब्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.पण, धबधब्यावर जात असताना तुमच्याकडे तंबाखू असणे महत्वाचे आहे. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तंबाखू कशासाठी हवी? या धबधब्याजवळ जात असताना जंगलातून चालत जावे लागते.

जंगलातून वाटेने चालत जात असताना आपल्या शरीराला रक्त शोषणारे जळू चिकटतात.

आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी जळू चिकटतो तिथे तो रक्त शोषतो. शरिरावर चिकटलेला जळू काढण्यासाठी तंबाखूचा वापर केला जातो. 

शरिरावर जळू चिकटल्यानंतर त्या जळूवर लगेच तंबाखू टाकल्यानंतर तो जळू शरिरावरून निघून पडतो. यासाठी तिकडे फिरायला जात अताना तंबाखू जवळ ठेवली जाते. 

गावाकडच्या पारंपरिक पद्धतीनुसार शरीराला जळू लागल्यास त्यावर तंबाखू टाकली जाते.तंबाखू टाकल्यानंतर जळू निघून पडतो.

शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो. 

Click Here