चिंताजनक! 50 टक्के कर्मचाऱ्यांकडे रिटायरमेंटचा प्लॅनच नाही

ग्रँट थॉर्टन भारतच्या सर्वेक्षणातून समोर आल्या धक्कादायक गोष्टी

खासगी क्षेत्रात काम करणारे जवळपास अर्धे कर्मचारी निवृत्तीसाठी काहीही बचत करत नाहीत.

निवृत्तीसाठीच्या नियोजनासाठी गुंतवणूक करणाऱ्या ५० टक्के कर्मचाऱ्यांची गुंतवणूक त्यांच्या एकूण पगाराच्या फक्त १ ते १० टक्के पर्यंतच असल्याचे समोर आले आहे.

देशातील ५५ टक्के कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर १ लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळवायची आहे.

दुसरीकडे चिंतेची बाब म्हणजे फक्त ११ टक्के जणांची सध्याची गुंतवणूक या अपेक्षा पूर्ण करू शकते.

ग्रँट थॉर्टन इंडियाच्या सर्वेक्षणात या बाबी समोर आल्या आहेत. २५ ते ५४ वयोगटातील लोकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला होता.

रिटायरमेंटसाठी लवकर गुंतवणूक करणे फायदेशीर असते. २५ ते ३० वय असताना सुरूवात केली, तर ६० व्या वर्षी मोठी रक्कम मिळू शकते. 

पीएफ आणि ग्रॅच्युइटी अनेकांना पुरेशी वाटते. अनेकांना सध्याच्या पगारात बचत कठीण झाले आहे.