पावसाळ्यात केस खराब होऊ नयेत म्हणून काळजी घेणे फार गरजेचे. पाहा काय करायचे.
पावसाचे पाणी कितीही छान गार वाटले तरी केसांसाठी जरा त्रासाचे ठरु शकते. पावसाळ्यात वाराही भरपूर सुटतो. त्यामुळे केस गुंततात आणि खराब होतात.
वाऱ्यासोबत उडणारी धूळ , माती केसात अडकते. केसांची गुणवत्ता कमी होते. इतरही काही वाईट परिणाम होतात. त्यामुळे केसांची काळजी घ्यायला हवी.
पावसाळ्यात केस मोकळे सोडून फिरु नका. वाऱ्यामुळे गुंता होतो. केस गुंतल्यावर गळतात आणि तुटतात. छान वेणी घालणे अगदीच फायद्याचे ठरते. वेणी नको तर किमान पोनी तरी बांधायला हवा.
पावसाच्या पाण्याने केस भिजल्यावर लगेच कोरडे करावेत. तसेच ठेवू नयेत. साध्या गोड्या पाण्याचे केस पुन्हा स्वच्छ करावेत.
केसावर फडके बांधा. गाडीवर बसताना जसा स्कार्फ घेता तसाच वारा सुटल्यावर केसांना गुंडाळायचा. धूळ, माती केसांवर बसत नाही.
केस जर आठवड्यातून एकदाच धुवत असाल तर पावसाळ्यात जरा दोनदा तरी धुवायचे. पाणी चांगले स्वच्छ वापरा. फक्त पाणी केसांवर ओतून चोळले तरी चालेल. असे केल्याने पावसाचे पाणी केसांवर राहणार नाही.
तसे पावसाचे पाणी काही धोकादायक ठरत नाही. मात्र बरेचदा पाण्याचे ओघळ केसांवर पडतात. बस, रेल्वे, गाडीमध्ये असताना. किंवा आडोसा घेतल्यावर कुठूनतरी वरुन येणारे ओघळ केसांवर पडतात त्याचा त्रास होतो.
कौलांच्या खाली तसेच पावसाच्या पाण्याचे दुसऱ्या पृष्ठभागावर पडून येणारे ओघळ अंगावर पडणार नाहीत याची काळजी घ्यायची.