पावसाळ्यात कपड्यांना डाग लागण्याची चिंता सोडा. पाहा काय करायचे.
पाळीच्या दिवसांमध्ये अर्धे लक्ष कपड्यांकडे असते. काही डाग लागला का? पॅड सरकलं तर नाही ना? या गोष्टींची चिंता लागलेली असते.
पावसाळ्यात मात्र ही चिंता दुप्पट होते. कारण सगळीकडे पाणी असते. पटकन कपड्यांना पाणी लागले आणि डाग लागला तर काय करावे असा प्रश्न असतो.
पावसाळ्यात पाळीच्या दिवसांमध्ये गाडीवर बसतानाही चिंता लागते. कारण गाडीची सीट ओलसर असते. त्यामुळे काळजी घ्यावी लागते.
आजकाल फडके तर फार कोणी वापरत नसेल. जास्त महिला पॅडच वापरतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पॅडऐवजी पिरीएड पॅण्टी वापरणे जास्त सोयीस्कर ठरु शकते.
अनेक कंपन्या ज्या तुमच्या ओळखीच्याच आहेत त्यांनी अशा पॅण्टीज लॉन्च केल्या आहेत. त्याला प्लास्टिकची लेअर असते. त्यातून पाणी अजिबात आत जात नाही.
पावसाळ्यात सलवार, पँण्ट गडद रंगाच्याच घाला. त्यामुळे आकार दिसत नाही आणि चालताना बसताना काळजी राहत नाही.
इतरही अनेक प्रकार आजकाल बाजारात मिळतात. अनेक महिला आता टेम्पॉन वापरतात. कप वापरतात. तुमच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि काही वेगळे वापरुन पाहा.