मराठी मालिकांची गाजलेली टायटल सॉँग्ज

लक्षात आहेत का ही गाणी?  मराठी मालिकांची सुंदर गाणी नक्की ऐका. 

चित्रपटांची गाणी सगळेच ऐकतात आणि गाणी ऐकणे म्हणजे सुख. मराठी गाण्यातील शब्द, त्यांची रचना, संगीत सगळेच मस्त असते. 

पण फक्त चित्रपट नाही तर, मराठी मालिकांचीही गाणी फारच सुंदर असतात. पूर्वी अशोक पत्कींनी तालबद्ध केलेली गाणी अनेक वर्षांनंतरही लोकांना तोंडपाठ आहेत.

देवकी पंडित यांच्या आवाजातील आभाळमाया मालिकेचे गाणे आजही घरोघरी लावले जाते. फार अर्थपूर्ण गाणे आहे.

सध्या सोशल मिडियावर प्रचंड गाजत असलेले गाणे म्हणजे वादळवाट. अनेक जण या गाण्याचे कव्हर व्हिडिओ तयार करत आहेत. 

वैशाली माडेच्या आवाजातील कुलवधू हे गाणे तर सगळ्या महिलांना फार जवळचे वाटते. लग्न करुन सासरी जाणाऱ्या मुलीची भावना अगदी सुंदर मांडली आहे. 

गान कोकीळा श्रेया घोषाल हिने गायलेले खुलता कळी खुलेना हे एका मिनिटाचे गाणे मोठ्या लांब गाण्यांपेक्षाही सुंदर आहे. नक्की ऐका. 

रमा बाई रानडे यांच्या जीवनावर आधारित उंचा माझा झोका ही मालिका फार गाजली होती. त्याचे गाणे फार गोड आणि सुरेल आहे.

मराठीत गाजलेली मालिका म्हणजे अवघाची हा संसार. पत्कींनी त्याचे गाणे फारच सुंदर तालबद्ध केले आहे.

'बिज अंकुरे अंकुरे' हे गाणे आजही आजी, आईच्या ओठी ऐकायला मिळते.  गोट्या या फार जुन्या मालिकेचे हे गाणे अगदी सुंदर आहे. 

Click Here