दिल की नजरसे! कमाल देखण्या अभिनेत्रीची अजरामर अदा

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचे नाव म्हणजे नूतन. उत्तम अभिनय आणि सुंदर रुप.

भारतीय सिनेमातील एक अजरामर नाव म्हणजे नूतन. त्या एक बहुआयामी अभिनेत्री होत्या. फक्त सुंदर रुप नाही अनेक गुणांनी संपन्न असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत नूतन यांचा समावेश होतो.       

४ जून १९३६ ला नूतन यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव नूतन समर्थ बहल असे होते. त्यांची आई-वडील चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यामुळे कलेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. 

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी पहिला चित्रपट केला होता. नूतनचा पहिला चित्रपट म्हणजे हमारी बेटी. 

१९५२ मध्ये नूतन मिस इंडिया ही स्पर्धा जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांचे वय १६ होते आणि त्याच्या सौंदर्यावर सगळे फिदा झाले होते.   

नंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट केले. मै, तुलसी तेरे आंगन की,  बंदिनी, सीमा, अनारी असे एकूण ८० चित्रपट त्यांनी केले. 

नूतन यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. इतरही अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. 

नूतन या प्रशिक्षित गायिका होत्या. त्यांनी कधी व्यावसायिक गायन क्षेत्रात पाय ठेवला नाही. मात्र त्या आवडीने गायच्या. 

नूतन यांचे आयुष्य फार सुखात गेले नाही. त्यांना अनेक त्रास सहन करावे लागले. त्यांचे त्यांच्या आईशी नाते फार चांगले नव्हती. तसेच त्यांची प्रेम कहाणीही अपूर्ण राहिली होती. 

१९५९ मध्ये नूतन यांचा विवाह नौदलातील लेफ्टनंट-कमांडर रजनीश बेहल यांच्याशी झाला. त्यांचा मुलगा मोहनीश बहल हा ही एक प्रसिद्ध अभिनेता आहे. 

वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सरच्या फैलावामुळे झाला. 

Click Here