अॅसिडीटी होणार नाही, टाळा हे '६' पदार्थ

काही पदार्थ खाणे टाळा. मिळेल आराम. अपचना होणार नाही. 

जर सतत अॅसिडिटीाच त्रास होतो. पोटात, छातीत सारखं जळजळतं तर मग त्यावर उपाय करणे गरजेचे. रोज औषध घेण्यापेक्षा असे पदार्थ कमी खा ज्यांच्यामुळे अॅसिडीटी वाढेल. 

जसे की साइट्रिक आणि आम्लारी फळं. या पदार्थांमुळे अॅसिडीटी फार वाढते. मग उलट्या होतात. संत्री, मोसंबी, अंजीर हे पदार्थ जरी थंड वाटले तरी त्यामुळे अॅसिडीटी वाढू शकते. 

टोमॅटो खाल्याने अॅसिडीटी वाढते. सगळ्यांनाच हा त्रास होतो असे नाही मात्र जर सतत जळजळ होत असेल तर एकदा टोमॅटो खाणे कमी करुन पाहा. 

आपल्याला रिकाम्या पोटी चहा, कॉफी प्यायची सवय असते. त्यामुळे अॅसिडीटी सर्वात जास्त होते. तसेच विकतच्या सोडायुक्त पेयांमुळे अॅसिडीटी कमी होईल असे समजून आपण ते पितो मात्र तसे केल्याने त्रास वाढेल. 

तळणीचे पदार्थ प्रचंड वाईट. त्यामुळे वजनही वाढते आणि अपचनही. अपचनामुळे मग पित्त, वात सगळेच त्रास होतात. 

मध्यपान केल्याने अॅसिडीटी भरपूर होते. फक्त तात्पुरती नाही तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. पचनाच्या प्रक्रियेत बिघाड होतो. त्यामुळे व्यसनांपासून दूरच राहा. 

बेकरी प्रॉडक्ट्स खाल्यानेही त्रास होतो. त्यात विरुद्ध आहाराचे पदार्थ एकत्र केलेले असतात. त्यामुळे अॅसिडीटी होऊ शकते.   

Click Here