सतत ऑनलाइन राहण्याची सवय फारच वाईट. पाहा काय त्रास होतील.
मोबाइलचा वापर आजकाल प्रमाणाबाहेर केला जात आहे. तरुण पिढी आहारी गेली आहेच मात्र इतर वयोगटातील लोकंही भरपूर मोबाइल वापरतात.
मोबाइलच्या विविध अॅप्सवरील गोष्टींचे अॅडीक्शन फार वाईट आहे. रोज काही ट्रेंड्स फॉलो केल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही.
सगळ्यात जास्त लोक रिल्स पाहण्याला आहारी गेले आहेत. तासंतास स्क्रोलींग करतात. डोळ्यांना आणि बुद्धीला त्यामुळे त्रास होतो.
लहान काही सेकंदाचे रिल्स, व्हिडिओ पाहण्याची सवय लागल्यामुळे संयम कमी झाला आहे. तसेच काही शिकण्याची क्षमता कमी झाली आहे.
लोकांच्या फोटो आणि स्टोरी पाहून स्वतःबद्दल नकारात्मकता मनात निर्माण होते. आपण त्यांच्यासारखे का जगत नाही किंवा आपण एखाद्यापेक्षा कमी आहोत असे वाटायला लागते.
इंस्टाग्रामवर सतत काही तरी व्हायरल चॅलेंज सुरुच असते. ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या नादात लोकं काहीही करतात. ट्रेंडच्या आहारी जाणे अजिबात चांगले नाही.
ज्यांना आयुष्यात भेटलोही नाही अशा लोकांना आपल्याबद्दल काय वाटते, याची काळजी करण्याची सवय लोकांना लागली आहे. त्यामुळे स्वतःचे आयुष्य जगताना दुसर्याचा दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा वाटायला लागला आहे.
दर दोन मिनिटांनी नोटीफीकेशन पाहण्याची सवय अनेकांना लागली आहे. कोणाचा मेसेज आला की कोणी पोस्ट लाईक केली याची चिंता लागून राहते.