मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर एकीकडे जल्लोष आणि उत्साहाला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे एका मूर्तिकाराचं मन गणरायाच्या विसर्जनामुळे अक्षरशः हळहळलं आहे. प्राण ओतून सुबक अशी घडविलेली सुंदर कला विसर्जिली जातेय. मूर्तिकारांसह लाखो लोकांना दुःख अनावर होते. बाप्पाच्या आगमन काळात असलेलं आनंददायी वातावरण त्याच्या विसर्जनामुळे अचानकपणे लुप्त होतं. पण तरीही पुन्हा नवा उत्साह, प्रेरणा घेऊन तो पुढच्या वर्षी येतोच !