आपण जर तूप चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आपल्यापैकी अनेकांना तुपाला पराठे किंवा तुपात शिजवलेल्या भाज्या खायला आवडतात.
जर आपणही अशा पद्धतीने तूप खात असू तर आरोग्याला नुकसान होऊ शकते.
जास्त प्रमाणात तूप गरम करुन खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.
यामुळे मुक्त रॅडिकल्स तयार होतात. जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. मग तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती?
सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप कोमट पाण्यासोबत घेणे फायदेशीर आहे.
थोडे तूप चपाती किंवा डाळीसोबत खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते.
रात्री दूध आणि तूप मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते आणि त्वचा चमकदार होते.