आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, पण योग्य वेळ कोणती जाणून घेऊया.
जास्त चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण योग्य वेळी प्यायल्याने त्रास कमी होतो.
चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी नाश्ता केल्यानंतर ८ ते ९ च्या दरम्यान असते.
सगळ्यात आधी नाश्ता करा मग चहा प्या, रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.
सकाळी चहा पित नसाल तर संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान चहा प्यावा.
संध्याकाळचा चहा देखील नाश्त्यासोबत प्यावा.
चहा रिकाम्या पोटी प्यायाल्याने जळजळ आणि गॅसेसच्या समस्या होतात.
याशिवाय जेवल्यानंतर लगेच चहा पिऊ नका, यामुळे लोह आणि खनिजांचे शोषण कमी होते.
रात्री झोपण्यापूर्वी चहा पिऊ नका, यामुळे झोपेचा त्रास होतो.