सलग काही दिवस तुम्ही साखर आणि इतर गोड पदार्थ खाणं टाळलं तर??
डॉ. तरंग कृष्णा सांगतात की साखर खाल्ल्याने फक्त मधुमेहाचा धोकाच वाढतो असं नाही. तर त्यामुळे कॅन्सरचाही धोका वाढतो.
शिवाय साखर किंवा गोड पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते.
गोड पदार्थ अतिप्रमाणात खाणाऱ्यांना वजन वाढीचीही चिंता नेहमीच भेडसावते.
त्यामुळे शुगर आणि आहारातले इतर गोड पदार्थ काही दिवस बंद केले तर नक्कीच वरील गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो.
शरीरावरची सूज कमी होऊन वजन कमी होईल. तसेच मधुमेहदेखील आटोक्यात राहण्यास मदत होईल, असं तज्ज्ञ सांगतात.