संध्याकाळी ५- ६ वाजेच्या दरम्यान अनेकांना थोडीशी भूक लागतेच.. त्यावेळी काय खावं हा प्रश्न पडतो.
त्यावेळी जर चिप्स, बिस्किट असे काही पदार्थ खाल्ले तर वजन वाढण्याचाही धोका असतोच.
म्हणूनच अशावेळी मखाना भेळ, मखाना चाट असे चटपटीत, हेल्दी पदार्थ तुम्ही खाऊ शकता..
अशावेळी ड्रायफ्रुट्स खाणे किंवा ड्रायफ्रुट्सचा शेक करून पिणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो.
संध्याकाळची छोटीशी भूक भागविण्यासाठी तुम्ही फळं खाऊ शकता किंवा मग त्यांची स्मूदीही घेऊ शकता.
वेगवेगळ्या प्रकारचं सूप पिणं हा देखील एक चांगला हेल्दी पर्याय ठरू शकतो.
राजमा, छोटे, वटाणे किंवा मोड आलेली कडधान्ये उकडून त्यांची भेळ करून खाणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.