विजय मांडे - कर्जत
हल्लीचा कर्जत विधानसभा मतदार संघ आणि पूर्वीचा खालापूर मतदार संघामध्ये जितक्या निवडणुका झाल्या त्या 198क् पासून चुरशीच्या झाल्या. त्यापैकी काही निवडणुकांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी झाली.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीचा उमेदवार तिस:या क्र मांकावर फेकला गेला व या विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला तब्बल 26हजार मतांचे मताधिक्य मिळाले त्यामुळे महायुतीत उमेदवारांची संख्या वाढली आहे. अक्षरश: भाऊगर्दी झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ही परंपरा खंडित होते की तशीच कायम राहते ते येणारा काळच ठरवील.
198क् साली कॉंग्रेसने पहिल्यांदाच खालापूर विधानसभा मतदार संघातून स्थानिक उमेदवार तुकाराम सुर्वे यांच्या रूपाने दिला. त्या काळी शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा होता. कर्जत तालुक्यातील काही गावामध्ये कॉंग्रेस कार्यकत्र्यांना प्रवेश मिळत नव्हता परंतु स्थानिक कार्यकत्र्याला उमेदवारी मिळाल्याने सारे काही सहन करून प्रसंगी नाती गोती बाजूला ठेवून आपल्या जीवा भावाच्या माणसाला निवडून आणले. निकालाच्याच दिवशी तुकाराम सुर्वे यांच्या गाडीला अपघात झाला होता त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्यांचा निकाल त्यांना दवाखान्यातच कळविण्यात आला.
1984 साली झालेल्या निवडणुकीत तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांना उमेदवारी न देता राजीव गांधींचे मित्न म्हणविणा:या शेख आफताब यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. आफताब यांचा काडीचाही सबंध खालापूर विधानसभा मतदार संघाशी नव्हता ऐन वेळी उमेदवारी मिळालेल्या आफताब यांचे काम करण्याची पाळी त्या वेळी कॉंग्रेस कार्यकत्र्यांवर आली. त्यावेळी शेकापक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णू ठाणगे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यांचा पराभव झाला व आफताब यांनाही निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले थोडक्यात बाहेरच्या उमेदवाराला मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखिवला.
1990 साली ए. आर . अंतुलेंनी लोकसभेला आपण निवडून यावे म्हणून आगरीसेनेला विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द देऊन आपण खासदारकी मिळवली व त्यांनी आपला शब्द पाळला. आगरीसेनेच्या माध्यमातून राम मुंढे यांना खालापूर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी दिली त्यामुळे अनेक वर्षांपासून उमेदवारीच्या रांगेत असलेल्यांची घोर निराशा झाली तरीही पुढच्या आशेने सर्व कार्यकत्यार्ंनी त्यांचे काम केले. 1995 साली शिवसेनेने पुन्हा देवेंद्र साटम यांना उमेदवारी दिली मात्न कॉंग्रेस पक्षाने उल्हास देशमुख यांना उमेदवारी दिल्याने रामदास शेंडे यांनी बंडखोरी केली तर शेतकरी कामगार पक्षाने विलास थोरवे या तरुण कार्यकत्र्याला निवडणूक रिंगणात उतरविले. यावेळी साटम पुन्हा निवडून आले मात्न बंडखोर रामदास शेंडे यांनी अपक्ष म्हणून 18 हजार मते मिळवून निवडणुकीत रंगत आणली होती.
198क् च्या तुकाराम सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. निवडून येणा:या कार्यकत्र्याला उमेदवारी न देणो ही कॉंग्रेसची परंपरा वेळोवेळी मतांवर परिणाम करणारी ठरली.
1999 साली कॉंग्रेस पक्षात दुफळी झाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय झाला. 2क्क्4 साली पुन्हा साटम यांना पक्षाने उमेदवारी दिली. आणि ते पुन्हा आमदार झाले.
2क्क्9 च्या विधान सभेची उमेदवारी सुरेश लाड यांना पुन्हा देण्यात आली. यावेळी शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली. आमदार साटम यांच्या विरोधात हनुमान पिंगळे यांनी दंड थोपटले. त्यांना शिवसैनिकांनी उचलून धरले, काही कॉंग्रेसजनांनीही त्यांना हातभार लावला. पिंगळे यांना तब्बल पंचवीस हजार मते मिळाली. त्यामुळे लाड यांना पराभवाचा वचपा काढता आला लाड पुन्हा विधानसभेत गेले.
शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी
42क्क्9 च्या निवडणुकीत महाराष्ट्र नाव निर्माण सेनेने प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवून त्यांचे उमेदवार एकनाथ पिंगळे यांनी साडे सतरा हजार मते मिळवली होती तर आगरी समाजाचे अपक्ष उमेदवार सावळाराम जाधव यांनी साडे बारा हजार मते मिळवून यावेळी त्यांनी अनेकांच्या अनामत रकमा जप्त केल्या होत्या.यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी असेल कारण महायुतीतून शेतकरी कामगार पक्षाने काडीमोड घेतला आहे लोकसभेला त्यांनी मनसेच्या सहकार्याने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली होती व त्यांचा उमेदवार दुस:या क्र मांकावर होता त्यामुळे यावेळी तिरंगी लढत अपेक्षित आहे.