आतापर्यंत संघटनेच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. फक्त एक महत्त्वाची १० लाख रुपये कॉर्पस फंड लवकरच मान्य होईल, या आशेवर आम्ही सर्वजण संक्रमण शिबिरात जाण्यासाठी तयार आहोत.
- बजरंग काळे
----------------------
रहिवाशांसोबत बैठक
२० सप्टेंबरला वरळी बीडीडी चाळ क्रमांक. ३० मधील रहिवाशी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी म्हाडा अधिकारी युवराज सावंत, संभाजी राणे, आर्किटेक्ट श्रीहरी दू सा, व्हटकर, अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने उपस्थित होते.
----------------------
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘म्हाडा’ची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.
----------------------
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरूत्थानाचा आशिया खंडातील सर्वांत मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन १९२० ते १९२४ या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.
----------------------
वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ, नायगाव आणि शिवडी येथे सुमारे ९२ एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली. शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यान्-पिढ्या १६० चौरस फुटांच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून ५०० फुटांची अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे.
----------------------
- वरळी येथे सर्वाधिक म्हणजे १२१ चाळी आहेत.
- वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिका (निवासी ९३९४ अनिवासी २९५) बांधण्यात येणार आहेत.
- या प्रकल्पात तळ ४० मजल्यांच्या ३३ पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत.
----------------------