नवी मुंबई : सलग दोन दिवस आलेले वादळ व मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले. परिसरातील तब्बल 9क् घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर 6 जण किरकोळ जखमी झाले. सोसाटय़ाच्या वा:याने 3क् पेक्षा जास्त ठिकाणी वृक्ष कोसळले असून शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
नवी मुंबईमध्ये सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोसाटय़ाचे वादळ व मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे तुर्भे स्टोअर परिसरामध्ये तीन घरांवरील पत्रे उडून गेले. कोपरखैरणो, वाशी, घणसोलीमध्ये 3क् ठिकाणी वृक्ष कोसळले. कोपरखैरणोमध्ये एका घरावर वृक्ष कोसळला तर काही ठिकाणी रोडवर झाडे पडली. यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. अगिAशमन दल व महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातील फोन खणखणू लागले. पडलेले वृक्ष हटविण्यासाठी अगिAशमन दलाच्या जवानांची तारांबळ होवू लागली होती. एमआयडीसीतील पावणोजवळील श्रमिक नगरमधील महापालिकेच्या शाळेच्या काचा विजांचा कडकडाट व वादळामुळे फुटल्या. फुटलेल्या काचांमुळे चार विद्यार्थी जखमी झाले. या सर्वाना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या अधिका:यांनी दिली. रात्री उशिरार्पयत पडलेले वृक्ष बाजूला काढण्याचे काम सुरू होते.
याच परिसरात मंगळवारी सायंकाळीही मुसळधार पाऊस व वादळ सुटले होते. या वादळामध्ये तुर्भे इंदिरानगर झोपडपट्टीतील तब्बल 87 घरांचे पत्रे उडून गेले. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये दोन जण जखमी झालेअसून एकाच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. रात्री नागरिकांची सोय समाजमंदिरामध्ये करण्यात आली होती. बुधवारी पालिकेच्या अधिका:यांनी तत्काळ पंचनामे करून मदत उपलब्ध केली. दोन दिवसात तब्बल 9क् घरांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
लोकमत प्रेसचेही नुकसान
मुसळधार पावसामुळे लोकमतच्या महापे प्रेसचेही नुकसान झाले आहे. छतावरील वर्गोल व पत्रेही निघून गेले आहेत. साईन बोर्डचेही नुकसान झाले . प्रेसच्या आवारात व कुंपनाबाहेरील वृक्षही कोसळले आहेत. प्रेसमध्ये पाणी आल्यामुळेही नुकसान झाले.
च्शहरात एकाच वेळी 3क् ठिकाणी वृक्ष कोसळले.वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. महापालिका आयुक्त आबासाहेब ज:हाड, आपत्कालीन विभागाचे प्रमुख जगन्नाथ सिन्नरकर व इतर सर्व अधिकारी घणसोली, कोपरखैरणो व पूर्ण शहरात मदतीसाठी रोडवर उतरले होते. आयुक्त व उपायुक्तांनीही स्वत: करवत हातामध्ये घेवून वृक्ष कापले.
अचानक वादळ सुरू झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पालिकेच्या सर्व अधिका:यांनी घटनास्थळी पोहचून उन्मळलेले वृक्ष बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. उशिरार्पयत मदतकार्य सुरूच असून चोवीस तास यंत्रणा दक्ष ठेवण्यात आली आहे.
- आबासाहेब ज:हाड, आयुक्त महापालिका