मुंबई : दिवसभर असणारा असह्य उकाडा आणि वाहणा:या घामाच्या धारा असे असणारे रोजचे चित्र मंगळवारी एकाएकी बदलले. अनेक ठिकाणी वाहत असलेला सोसाटय़ाचा वारा आणि ढगाळ वातावरण यामुळे मुंबईकर काहीसे सुखावले. संध्याकाळी काही भागांत शिडकावा झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र वा:यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या सोसाटय़ाच्या वा:याने शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ डोंगराळ वस्त्यांमध्ये घरावरचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या.
गेले काही दिवस आद्र्रतेमुळे मुंबईकरांना तीव्र उकाडय़ाला सामोरे जावे लागत आह़े या वा:यामुळे दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सोसाटय़ाच्या या वा:याने रस्त्यांवर धुळीचे लोट निर्माण झाले. शिवाय वा:याची गती अधिक असल्यामुळे दुचाकीस्वारांनाही काहीशी अडचण निर्माण झाली. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे पादचारीही धूळ आणि वा:यापासून बचावाकरिता धडपडत होते.