शेफाली परब-पंडित - मुंबईआपत्तीच्या काळात संपर्काच्या सर्व यंत्रणा अयशस्वी ठरत असताना महत्त्वाचे संदेश पोहोचवून मदतकार्याला गती देण्यात वायरलेस यंत्रणेची मोठी भूमिका असते़ मात्र या यंत्रणेचा वापर करण्यासाठी देय असलेले परवाना शुल्क २०११ पासून भरण्यात आलेले नाही़ अग्निशमन दलाच्या या बेपर्वाईमुळे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयातून या संपर्क यंत्रणेचे दोर कापले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे़मोबाइलचा प्रसार वाढण्यापूर्वीच मुंबई अग्निशमन दलामध्ये १९६० पासून संपर्कासाठी वॉकीटॉकी वापरला जातो़ या यंत्रणेच्या वापरासाठी अग्निशमन दलास दरवर्षी दूरसंचार मंत्रालयाकडे ५५ लाख रुपये भरावे लागतात़ मात्र २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ या चार वर्षांमध्ये परवाना शुल्कापोटी देय रक्कम अग्निशमन दलाने भरलेली नाही़ वर्षाच्या सुरुवातीलाच हे शुल्क जमा करावे लागते़ चार वर्षांत तब्बल दोन कोटींची रक्कम थकविण्यात आल्यामुळे दूरसंचार मंत्रालयाने ३३ लाख रुपये दंड भरण्याचे फर्मानही सोडले आहे़ ही रक्कम थकविल्यास वायरलेस यंत्रणेचा परवानाच रद्द होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते़ याबाबत मंत्रालयाशी चर्चा सुरू असून, पाठविलेला धनादेश न वठल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़आरे कॉलनीचा संपर्कही तुटणारगोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये वायरलेस यंत्रणेच्या सिग्नलसाठी टॉवर उभा करण्यात आला आहे़ याचेही वार्षिक साडेचार लाख रुपये गेली तीन वर्षे भरण्यात आलेले नाहीत़ मात्र उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीचे बिल परवडत नसल्याने हा सिग्नल बंद करण्यात येणार असल्याचे समजते़च्मुंबईच्या विकासाच्या तुलनेत अग्निशमन दलाचा विकास झालेला नाही़ त्यामुळे आजही या दलामध्ये १९६० पासूनची वायरलेस यंत्रणा आहे़ ३५० वायरलेस यंत्रे जवान व अधिकाऱ्यांना पुरविण्यात आली आहेत़ मात्र ही यंत्रणा जुनी असल्याने एका वेळी एकच व्यक्ती आवाजी संदेश पाठवू शकतो़ ही यंत्रणा बदलून अद्ययावत संपर्क यंत्रणा आणण्याचा प्रस्ताव २००८ पासून चर्चेत आहे़वॉकीटॉकी यंत्र-३५०परवान्यासाठी देय वार्षिक रक्कम - ५५ लाख रुपये़चार वर्षांची थकबाकी - दोन कोटी २० लाख रुपये़दंड - ३३ लाख रुपये़
आपत्तीच्या काळात संपर्क तुटणार?
By admin | Updated: March 3, 2015 01:32 IST