Join us  

आझमींची सायकल ‘डम्पिंग’चा चढ ओलांडून हॅट्ट्रिक साधणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:40 AM

शिवसेना, भाजप, काँग्रेसकडे टक्कर देणाऱ्या उमेदवारांची वानवा : मुस्लीम समाजाची मते एकगठ्ठा व निर्णायक

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देवनार येथील डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी आणि त्यामुळे स्थानिकांना उद्भवणाºया समस्या कायम असूनही समाजवादी पार्टीचे महाराष्टÑातील सर्वेसर्वा आणि विद्यमान आमदार अबू असीम आझमी मानखुर्द -शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयाची पताका फडकावत हॅट्ट्रिक साधण्याच्या मार्गावर आहेत. या ठिकाणची प्रमुख समस्या कायम असतानाही सत्ताधारी सेना-भाजपसहित कॉँग्रेसकडेही त्यांच्या विरोधात सध्याच्या घडीला प्रबळ उमेदवार नाही.त्यामुळे महानगरासह राज्यभरातील मतदारसंघात भाजप-सेनेचे वर्चस्व वाढले असताना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ मात्र त्याला अपवाद राहिला असल्याची परिस्थिती आहे. गेल्या दहा वर्षांपासून एकहाती वर्चस्व ठेवलेल्या अबू आझमी यांना यंदा काँग्रेस- राष्टÑवादीचा पांठिबा मिळण्याची दाट शक्यता आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मत विभागणीचा धोका टळल्यातच जमा आहे.मध्यम, निम्न मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांची वस्ती असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम समाजाची मते एकगठ्ठा व निर्णायक आहेत. मतदारसंघातील डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. ते तेथून हलविण्याचा प्रयत्न आझमी यांनी विधिमंडळात व विधिमंडळाबाहेरही मोठ्या प्रमाणात केला आहे. रोज जमा होणाºया हजारो टन कचºयाची विल्हेवाट लावणे व त्याचे पुनर्विघटन करण्याबाबत सबळ पर्याय मिळालेला नाही. त्यामुळे देवनारमधील डम्पिंग ग्राउंडवर रोज येणाºया शेकडो टन कचºयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम राहिला आहे. तीन-चार वर्षांपूर्वी या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे काही निष्पाप जीवही गेले. त्यावर राजकारणही भरपूर झाले. गुन्हे शाखेकडून घटनेचा तपासही झाला. मूळ समस्या कायम राहिली आहे.गेल्या निवडणुकीमध्ये अबू आझमींनी निर्विवाद वर्चस्व असल्याचे दाखवून देताना निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सुरेश पाटील यांचा १० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. युसूफ अब्रानी यांनी ही लढत प्रतिष्ठेची करूनही तिसºया स्थानी राहिले होते. आझमी यांना ४१ हजार ७२० तर पाटील यांना ३१ हजार ७८२ मते मिळविली होती. तर अब्रानी यांना २७ हजार ४९४ मते मिळाली होती.गेल्या पाच वर्षांमध्ये बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. देशभरात गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसची या ठिकाणीही बिकट अवस्था आहे. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेससह सपानेही सपाटून मार खाल्ल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आझमी यांची उमेदवारी कायम राहील. शिवाय माजी आमदार युसूफ अब्रानी यांनी मानखुर्दऐवजी वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयएमकडेही या ठिकाणी फारसा वाव नाही. त्याचप्रमाणे विरोधी शिवसेनेमध्येही अंतर्गत गटबाजी आहे. गेल्या वेळी निवडणूक लढविलेले पाटील हे संपर्कात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या वेळी शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल, या आशेने कॉँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी पंधरवड्यापूर्वीच मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले आहे. तिकीट मिळण्याच्या तडजोडीवरच त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले जात असले तरी मूळ शिवसैनिकांत त्यांच्याबद्दलची नाराजी कायम आहे.सत्ताधाºयांकडे प्रबळ प्रतिस्पर्धी नसणे, कॉँग्रेस राष्टÑवादीची सपाला साथ देण्याची मानसिकता, अल्पसंख्याकांच्या एकगठ्ठा मताच्या जोरावर अबू आझमी सायकलवर स्वार होऊन सलग तिसºयांदा विजयी होण्याची दाट शक्यता आहे.