Join us

वाय-फायवर पहारा

By admin | Updated: March 4, 2015 23:10 IST

सायबर गुन्हे हे भविष्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना कारणीभूत ठरणारी वाय-फाय यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी गुन्हे शाखेने पाऊल उचलले आहे.

नवी मुंबई : सायबर गुन्हे हे भविष्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना कारणीभूत ठरणारी वाय-फाय यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी गुन्हे शाखेने पाऊल उचलले आहे. त्यासाठी विशेष सात पथके तयार करून असुरक्षित वाय-फायचा शोध घेतला जात आहे.तरुणांना आकर्षित करण्यासाठी वाय-फायसारख्या अद्ययावत इंटरनेट सुविधा सध्या पुरवल्या जात आहेत. हॉटेल व मॉलमध्ये देखील मोफत वाय - फाय देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. मात्र मोफत वाय-फाय सुविधा पुरवताना खबरदारी न घेतल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार शोधणे कठीण असल्याने भविष्यात पोलिसांची डोकेदुखी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे वाय-फायच्या सुरक्षेचे संकट टाळत सिक्युअर वाय-फाय सिटीची मोहीम गुन्हे शाखेने हाती घेतली आहे. या मोहिमेला सोमवारपासूनच सुरुवात करण्यात आल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. ‘पॅरामिड सायबर सिक्युरिटी अँड फॉरेन्सिक’ या कंपनीच्या माध्यमातून पोलिसांनी विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे. लॅपटॉपद्वारे हे सॉफ्टवेअर घेऊन पोलिसांची सात पथके आठ दिवस पोलीस आयुक्तालयांत फिरणार आहेत. हे सॉफ्टवेअरलगतच्या परिसरातील असुरक्षित वाय-फायचा शोध घेऊन त्याची माहिती देणार असल्याचेही उपआयुक्त मेंगडे यांनी सांगितले.स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे मोबाइलमध्येच अनेक पध्दतीने इंटरनेटचा वापर होत आहे. अशा वेळी चोरीच्या मोबाइलमधून दुसऱ्याचे वाय-फाय हॅक करून दहशत पसरवणारे ईमेल देखील पाठवले जावू शकतात. त्यामुळे भविष्यातले वाय-फायद्वारे होणारे सायबर गुन्हे टाळण्याकरिता गुन्हे शाखा पोलिसांनी कंबर कसली आहे. या मोहिमेअंतर्गत पासवर्डचा वापर न करता असुरक्षितरीत्या वापरल्या जाणाऱ्या वाय-फायधारकांना शोधून त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. तर नोटीस बजावूनही वाय-फायच्या वापरात सुरक्षेची खबरदारी न घेणाऱ्यांवर सायबर कलमांतर्गत कारवाईची शक्यता गुन्हे उपआयुक्त मेंगडे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)च्सानपाडा येथील गुनिना इमारतीमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकाचे इमेल अकाउंट २००८ साली वाय-फाय वापरून हॅक करण्यात आले होते. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने हा ईमेल हॅक करून अहमदाबाद येथील साखळी बॉम्बस्फोट केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे परदेशी नागरिकाला पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले.च्वाशी येथे देखील एका नागरिकाचे वाय-फाय वापरून वादग्रस्त ईमेल पाठवण्यात आला. वाय-फायचा गैरवापर झाल्याच्या अशा अनेक तक्रारी सायबर सेलकडे दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा पोलिसांनी वाय-फाय सुरक्षेच्या खबरदारीचे पाऊल उचलले आहे.