Join us

एनएसएसच्या विद्याथ्र्याचे गुण गेले कुठे?

By admin | Updated: August 3, 2014 00:51 IST

महाविद्यालयातील टीवायबीए, बीकॉम आणि बीएससीच्या एनसीसी आणि एनएसएसच्या विद्याथ्र्याना मिळणारे दहा गुणांचे ग्रेडिंगच त्यांच्या गुणपत्रिकेवर नमूद करण्यात आलेले नाही.

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील टीवायबीए, बीकॉम आणि बीएससीच्या एनसीसी आणि एनएसएसच्या विद्याथ्र्याना मिळणारे दहा गुणांचे ग्रेडिंगच त्यांच्या गुणपत्रिकेवर नमूद करण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या प्रकरणी महाविद्यालयांचे प्राचार्यही कुलगुरूंकडे लवकरच दाद मागणार आहेत.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील एनसीसी, एनएसएसमध्ये सहभाग घेणा:या विद्याथ्र्याना परीक्षेत दहा गुण दिले जातात. त्याचा उल्लेख विद्याथ्र्यांच्या गुणपत्रिकेवर करण्यात येतो. मात्र विद्यापीठामार्फत मार्च महिन्यात घेतलेल्या टीवायबीए, टीवायबीकॉम, टीवायबीएससी आणि बीएडच्या अभ्यासक्रमातील विद्याथ्र्याच्या गुणपत्रिकेवर ग्रेडिंगचा समावेश केलेला नाही. 
विद्याथ्र्याना एनसीसी आणि एनएसएसच्या गुणांपासून वंचित ठेवल्याने महाविद्यालयांचे प्राचार्यही आक्रमक पवित्र घेणार असल्याचे समजते. बीएडच्या एनसीसी, एनएसएसमध्ये सहभागी होणा:या विद्याथ्र्याना 2क्11 पासून अंतिम परीक्षेत याचे गुण दिले जात नाहीत. याबाबत परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)
 
यंदा तर विद्यापीठ प्रशासनाने हद्द केली असून विद्याथ्र्याना  एनसीसी, एनएसएसचे गुण दिलेले नाहीत. विद्याथ्र्याना तातडीने हे गुण देण्यात यावेत, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली आहे.