मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाच कोळसा आणि गॅसच्या तुटवडय़ामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट आले आहे. 15 दिवसांपूर्वी राज्यात विजेची मागणी 14 हजार 5क्क् ते 15 हजार 5क्क् मेगाव्ॉटच्या दरम्यान होती. आता ही मागणी 16 हजार 5क्क् ते 16 हजार 8क्क् मेगाव्ॉट अशी वाढली आहे. गेल्यावर्षी या काळात विजेची मागणी 12 हजार 2क्क् मेगाव्ॉट होती. त्या तुलनेत सध्याची मागणी 4 हजार 6क्क् मेगाव्ॉटने वाढली आहे.
सध्या महानिर्मितीच्या खापरखेडा, पारस आणि भुसावळ या केंद्रांत एक ते अध्र्या दिवसाचा कोळसा शिल्लक आहे. इंडिया बुल्सकडून कोळशाअभावी 27क् मेगाव्ॉट वीज कमी मिळते आहे. गॅसअभावी 1 हजार 95क् मेगाव्ॉटचा रत्नागिरी गॅस प्रकल्प बंदच आहे. उरण गॅस केंद्रात
15क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती कमी झालेली आहे. तर अदानी प्रकल्पातून 2 हजार 5क्क् मेगाव्ॉट वीज अपेक्षित असताना काही दिवसांपासून तेथून 1 हजार 5क्क् ते 1 हजार 7क्क् मेगाव्ॉट वीज मिळते आहे. यामुळे विजेची उपलब्धता कमी झाली असतानाच हवामानातील अनिश्चिततेचा फटकाही बसला आहे.
15 दिवसांत विजेच्या मागणीत 1 हजार ते 1 हजार 5क्क् मेगाव्ॉटने वाढ झाली आहे. त्यामुळे विजेच्या मागणी आणि पुरवठय़ाचा मेळ घालण्यात अडचणी येत आहेत. यामुळे राज्यात काही प्रमाणात भारनियमन करावे लागते आहे. दरम्यान, मागणीच्या तुलनेत विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधून दररोज 1 हजार ते 1 हजार 4क्क् मेगाव्ॉट वीज घेतली जात आहे. शिवाय पारदर्शक निविदा प्रक्रियेतून 3क्क् मेगाव्ॉट विजेची व्यवस्था केली आहे. उरण गॅस
केंद्राला बाजारातून गॅस उपलब्ध
करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात
येत असून, त्यामुळे 1क्क् ते 15क्
मेगाव्ॉट ज्यादा वीज उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती महावितरणने दिली. (प्रतिनिधी)
च्महावितरणला दररोज कोळसा आणि गॅसच्या पुरवठय़ातील तुटीमुळे 2 हजार मेगाव्ॉट वीज कमी मिळते आहे. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून किमान 5 हजार 5क्क् मेगाव्ॉट वीज अपेक्षित असताना तेथून केवळ 4 हजार आणि 4 हजार 5क्क् मेगाव्ॉट वीज मिळते. महानिर्मितीला दररोज 32 कोळशाच्या रेक्सची गरज असताना प्रत्यक्षात 15 ते 16 रेक्स मिळत आहेत.