Join us

वसई किनाऱ्याला लाटांचा तडाखा

By admin | Updated: June 12, 2014 23:58 IST

वादळी वाऱ्याचा जोर गुरुवारी कमी झाला, तरी वसई समुद्र किनाऱ्यावरील हाय टाईडमुळे मोठ्या लाटा उसळल्या होत्या.

नायगाव : वादळी वाऱ्याचा जोर गुरुवारी कमी झाला, तरी वसई समुद्र किनाऱ्यावरील हाय टाईडमुळे मोठ्या लाटा उसळल्या होत्या. दुपारी १२ वा. पासून जवळपास ४ मीटर उंचीच्या लाटा सुरुची बाग, मर्सिस रानगांव किनाऱ्यावर दिसून येत होत्या. या लाटांनी वसईचा समुद्र किनारा अक्षरश: धुवून काढला. नव्यानेच सुरू झालेल्या सुरूची बाग येथील बंधाऱ्यालाही त्याचा फटका बसला. दुपारनंतर पाण्याची पातळी वाढल्यावर पर्यटकांनी किनाऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेवूनच पर्यटनाचा आनंद घेतला. (वार्ताहर)