Join us

उल्हासनगरवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: June 30, 2014 23:30 IST

पाणीपुरवठय़ाची 278 कोटींची थकबाकी पुढे करून एमआयडीसीने पाणीकपात केल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

उल्हासनगर : पाणीपुरवठय़ाची 278 कोटींची थकबाकी पुढे करून एमआयडीसीने पाणीकपात केल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.  
उल्हासनगर महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसी पालिकेला दरदिवशी 12क् एमएलडी पाणीपुरवठा करीत असून, शहरातील विविध भागांत पाणीटंचाई कायम आह़े गेल्या आठवडय़ात एमआयडीसीकडे वाढीव पाणीपुरवठयाची मागणी केली आहे. मात्र पावसाअभावी पाणीकपातीचे संकट उभे ठाकल्याने शहरात पाणीटंचाईचे सावट पसरले आहे.
शहरात आधीच पाणीटंचाई असताना पाणीकपात झाली तर, तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.  पालिकेने 155 एमएलडी वाढीव पाणी पुरवठयाची मागणी एमआयडीसी गेल्या आठवडयात केली आहे.   मात्र एमआयडीसीने पाणीपुरवठा वाढविण्याऐवजी वाढीव पाणीपुरवठय़ाचे बिल पालिकेला पाठविल्याची माहिती स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी यांनी केली आहे.  मंजूर पाणीपुरवठय़ापेक्षा जादा पाणी वापरणो, जलमाफक यंत्रची दुरुस्ती, विलंब शुल्क आदी बिलापोटी 278 कोटी 95 लाखांची थकबाकी दाखवल्याने पालिकेच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
 
ठेकेदारांची देणीही बाकी
च्महापालिका दरमहा पाणीबिलापोटी एमआयडिसीला दरमहा अडीच कोटीचे बिल अदा करीत आहे. एलबीटीचे उत्पन्न घटल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळयाच्या स्थितीत असून इतर उत्पन्न मिळेनासे झाले आहे. पालिका उत्पन्न घटल्याने कर्मचा:याचे पगार, पाणी बिल व कच:याच्या ठेकेदाराचे बिले देणो ऐवढेच काम सहा महिन्यांपासून पालिका करीत असून ठेकेदाराची देणीही गेल्या जानेवारीपासून अदा करण्यात आली नाहीत.
च्एलबीटीबाबत शासनाने वेळीच निर्णय घेतला नाही तर पालिका मूलभूत सुख-सुविधा देण्यास असमर्थ ठरणार असल्याचे मत आयुक्त बालाजी खतगावकर यांनी व्यक्त केल़े दरम्यान पाणीकपातीची शक्यता लक्षात घेऊन स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे. शहर टँकरमुक्त करण्याच्या संकल्पनेला कधीच छेद गेला असून शहरात टँकरची मागणी वाढत आहे.
 
च्नेवाळी : कल्याण पूर्व शिळफाटा रोडवरील टाटा पावर हाऊस जवळील सुचकनाका वजन काटय़ाजवळ मुख्य वाहिनीतून दिवसाकाठी हजारो लिटर पाणी वाया जात असून रस्त्याच्या कडेला या पाणी गळतीकडे कोणाचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
च्दर वर्षी सात जूनला आगमन होणा:या पावसाने जून महिना उलटूनही दडी मारल्याने जिल्हय़ातील धरणाच्या पातळी खालावली असल्याच्या बातम्या रोज वर्तमान पत्रंमध्ये वाचूनही अधिकारी, समाजसेवक, राजकीय नेते फक्त खंत व्यक्त करताना दिसते.
 
च्असे असले तरी प्रत्यक्ष पाणी वाचविण्यासाठी योग्य ते प्रयत्न करताना दिसत नाही. मी माङो पद, नोकरी, वर्तमानपत्रत प्रसिद्धी बॅनरवर चौकाचौकात फोटो लावण्यातच धन्यता मानतो. मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होऊ नये म्हणून  या पाण्याचा वापर करणा:यांनी बारदान गोणी टाकली असली तरी पाणी गळती दिसत आहे. 
 
च्भातसानगर : महिनाभरापेक्षा अधिक काळ लांबलेल्या पावसामुळे यावर्षी भयानक पाण्याची कमतरता भासणार असल्याच्या भीतीमुळे हजारो रुपये खर्च करून विंधन विहिरी खोदण्याचा सपाटा लावला आहे. कुठे पाणी, तर कुठे कोरडी जमीन, असे दृष्यही पाहायला मिळत आहे.
च्लांबलेल्या पावसामुळे धास्तावलेल्या ग्रामीण जीवनावर पाण्याच्या तुटवडय़ाचा मोठा परिणाम होणार आहे. हे लक्षात घेऊन शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर दिवसरात्र इंधन विहिरी (बोरिंग) लावण्याचा सपाटा लावला आहे. शेती ओस पडली तरी प्यायला पाणी मिळावे, या आशेने विंधन विहिरी खोदल्या जात आहेत. काही विंधन विहिरींना पाणी लागल्याने आनंद होऊन पेढे वाटले जात आहेत. तर पाणी न लागणा:या शेतक:यांचा विंधन विहिरीचा खर्च फुकट जात असल्याचे दु:ख जाणवत आहे.
च्एक विंधन विहीर खोदण्यासाठी 4क् ते 5क् हजार रुपयांचा खर्च येत आहे. हा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नसल्याने त्यांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उंच ठिकाणी वसलेल्या गाव-पाडय़ांमध्ये विंधन विहिरींना पाणी लागत नसल्याने तेथे पाण्याची समस्या बिकट होणार आहे. 
 
कल्याणात फक्त तीन आठवडय़ांचा पाणीसाठा
च्कल्याण : पावसाने दडी मारल्याने राज्यात इतरत्र पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असताना कल्याण-डोंबिवली शहराला पाणीपुरवठा करणा:या बारवी धरणात फक्त तीन आठवडे पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे 8 जुलैर्पयत पाऊस न पडल्यास शहरात पाणीकपात लागू केली जाणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली. सभागृहनेते कैलास शिंदे आणि गटनेते रवींद्र पाटील, नगरसेवक विजय काटकर यांच्यासह मोहिली उदंचन आणि जलशुद्धिकरण केंद्राला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
 
च्जून महिना संपला असला तरी अद्याप पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील पाणीसाठय़ाची नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी पालिकेतील सत्ताधा:यांनी केली. यावेळी त्यांच्याबरोबर जलअभियंता अशोक बैले, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा हे अधिकारी उपस्थित होते. त्यात कल्याण-डोंबिवलीकरांच्या दृष्टीने पाण्याची काहीशी समाधानकारक स्थिती असल्याचे समोर आले. 
च्सध्या कल्याण-डोंबिवलीत मंगळवार वगळता इतर सर्व दिवस सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कल्याण-डोंबिवलीसाठी पाणीकपात लागू करण्याची कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. तर कल्याण-डोंबिवलीकरांना 2क् जुलैर्पयत मुबलक पुरेल इतका पाणीसाठा सध्या उपलब्ध आह़े परंतु येत्या 8 जुलैर्पयत पाऊस सुरू न झाल्यास पालिका परिसरात आठवडय़ातून दोनवेळा पाणीकपात करावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. या धर्तीवर नागरिकांनी पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन त्यांनी केले आहे.