Join us

अनोखी मॅरेथॉन

By admin | Updated: May 3, 2014 14:54 IST

रंग्याबाबत लोकांमध्ये आत्मियता निर्माण व्हावी म्हणून खलिद कुरेशी या व्यक्तीने १५ ऑगस्ट रोजी गेट वे ऑफ इंडियापासून इंडिया गेटपर्यंत मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.

अनोखी मॅरेथॉनतिरंगा घेऊन धावणार ६८ दिवसमुंबई : तिरंग्याबाबत लोकांमध्ये आत्मियता निर्माण व्हावी म्हणून खलिद कुरेशी या व्यक्तीने १५ ऑगस्ट रोजी गेट वे ऑफ इंडियापासून इंडिया गेटपर्यंत मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यंदा मॅरेथॉनचे तिसरे वर्ष असून सलग ६८ दिवसांच्या या मॅरेथॉनमध्ये कुरेशी २ हजार २०० किमीचे अंतर हातात तिरंगा घेऊन धावणार आहेत.शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कुरेशी म्हणाले, मुंबईतून सुरू होणारी मॅरेथॉन महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली अशा पाच राज्यांतून धावणार आहे. त्यात पाचही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. शिवाय हातात तिरंगा घेऊन धावण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता शाहरूख खान आणि प्रत्येक शहरातील खासदारांनाही आमंत्रित करणार असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून सुरू होणार्‍या मॅरेथॉनमध्ये लोकांना टप्प्याटप्प्याने सामील होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यात शहरी भागातून धावताना शालेय मुलांसह ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य धावपटूंना धावण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तर द्रुतगती मार्गावर व्यावसायिक धावपटू धावणार आहे. शिवाय विविध धर्मांच्या संघटना आणि संस्थांनाही तिरंगा हातात घेऊन धावण्याची विनंती करणार असल्याचे कुरेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)...........................