कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील बहुतांश रस्त्यांचे काँक्र ीटीकरण झाल्याने रस्ते चकाचक झाले त्यामुळे पूर्वी बकाल वाटणारे शहर कर्जतच्या प्रवेशद्वारापासूनच नीटनेटके वाटते. त्यातच श्रीसदस्यांनी शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवून वर्षानुवर्षे पडलेली घाण व कचरा साफ केल्याने शहराचे रूपच बदलले आहे. मात्र कर्जत शहराच्या कडेने वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये कचरा व घाण टाकली जात आहे. नदी पात्रात अतिक्र मण करून बांधलेल्या घरांमधील सांडपाणी थेट नदीत सोडल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कर्जतकरांचे आरोग्य धोक्यात येईल.कर्जत नगरपरिषदेची स्थापना होऊन बावीस वर्षे झाली. यामध्ये कर्जत ग्रामपंचायतीतील पाच गावे, दहिवली ग्रामपंचायत व शिरसे ग्रामपंचायतीतील आकुर्ले गावाचा समावेश करण्यात आला. सुरु वातीला नगरपरिषदेकडे एकही घंटा गाडी नसल्याने इतक्या मोठ्या परिसराचा कचरा उचलणे जिकिरीचे होते. ट्रॅक्टरद्वारे कचरा उचलला जात होता. त्यानंतर घंटा गाड्या आल्या, कामगारही आले. त्यामुळे कचरा उचलणे सोपे झाले. तरीही नियोजनाअभावी कचरा उचलण्यात हयगय होत होती. दररोज येणारी घंटागाडी कधी कधी दांडी मारू लागली. यावर तोडगा म्हणून स्थानिक नगरसेवकांच्या घंटागाड्या धावू लागल्या. कागदावर जरी दुसरी नावे असली तरी या गाड्या स्थानिक नगरसेवकांनी आपापल्या परिसरात कचरा उचलण्याचा ठेका घेतला.कर्जत शहरातला कचरा दररोज उचलला जात असला तरी ठरावीक ठिकाणचा कचरा तसाच आहे. दोन, तीन महिन्यांपूर्वी श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि ‘तो’ सर्व कचरा त्यांनी साफ केला. कर्जत शहराच्या कडेने वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये अतिक्र मण करून बांधलेल्या इमारतींचे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडल्याने प्रदूषण वाढले. त्याचा बंदोबस्त करून कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था नगरपरिषद प्रशासनाने करणे संबंधितांना भाग पाडणे आवश्यक आहे. (वार्ताहर)
कर्जतमध्ये उल्हास नदी प्रदूषित !
By admin | Updated: June 6, 2015 22:45 IST