Join us  

मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 12:31 AM

तलावांमध्ये ४३ टक्के जलसाठा; पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाण्यासाठी गेले काही महिने वणवण करणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४३.९२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीइतकाच हा जलसाठा असून, तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे.

१२ जुलै रोजी सकाळपर्यंत तलावांमध्ये एकूण सहा लाख ३५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला सहा लाख ३६ हजार तर २०१७ मध्ये सात लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला होता. मुंबईला दररोज १८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरून वाहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी २४ तासांमध्ये तलावांत तब्बल ८८ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला होता. गेल्या तीन-चार दिवसांत पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. 

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)तलाव कमाल किमान आजची स्थितीमोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६०.६१तानसा १२८.६३ ११८.८७ १२६.०७विहार ८०.१२ ७३.९२ ७७.६७तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१०अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ५९४.०३भातसा १४२.०७ १०४.९० १२३.३६मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २७२.६०ी आणखी आठ लाख ११ हजार जलसाठ्याची गरज आहे.

टॅग्स :मुंबई