ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : मुंबई विद्यापिठात अखिल भारतीय विदयार्थी परिषदेने आज विद्यापिठातील पेपरफुटी आणि संकेतस्थळ बंद पडल्यामुल्याच्या प्रकरणाबद्दल ठिय्या अंदोलन केले. दुपारी एकच्या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील आंबेडकर भवनमध्ये ठिय्या अंदोलन केले. कुलगुरु डॉ. संजय देशमुख विद्यापिठात हजर नसल्यामुळे दीड तासांनंतर त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर शेवटी कुलगुरुने पुठील आठवड्या भेटण्याचं आणि अडचणी सोडवण्याचं अश्वासन दिल्याचे ABVPचे मुंबई मंत्री अनिकेत ओव्हळ यांनी लोकमतशी बोलताना माहीती दिली.
संकेतस्थळाच्या सरर्वरची शमता वाढवणे, पेपर फुटी प्रकरणी पोलिसांना योग्य ते सहकार्य करणे, विद्यापिठात आलेल्या नवीन आधिकाऱ्यांच्या कामकाजाचे अव्हलोकन करने. अश्या पध्तीचे अश्वासन कुलगुरुंनी दिल्यानंतर ABVPने आपले आंदोलन स्थगित केलं.